दीड किमीचा रस्ता स्वखर्चातून करून पाळले दिलेले वचन:पराभवानंतरही गणेश ढोरमारे यांनी बनवला रस्ता
निवडणुकीत विजय-पराभव हा राजकारणाचा भाग असतो, मात्र निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पराभवानंतरही पाळणे हीच खरी माणुसकी आणि लोकसेवेची ओळख आहे. याचा प्रत्यय भराडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये आला असून जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही गणेश ढोरमारे यांनी प्रचारादरम्यान काटोन वस्तीतील शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ‘निवडणुकीचा निकाल काहीही असो, तुमचा रस्ता करून देणार,’ या एका…