आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे निर्देश
पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. पूरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांत तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागांत तत्काळ मदत पोहोचेल. यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. यासाठी सर्व स्तरांवरील संपर्क यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि बचाव पथके २४ तास कार्यान्वित ठेवून जिल्हा प्रशासनाने नेहमी सतर्क राहावे. असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी…