हिंगोलीत दिड लाखाच्या कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या:कुटुंबावर दुःखाचा डोंगर; हट्टा पोलिस ठाण्यात नोंद
वसमत तालुक्यातील गुंडा येथील तरुण शेतकऱ्याने नापीका व दिड लाख रुपये कर्जाला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २० अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील गुंडा येथील दत्ता दिगांबर चव्हाण (३२) यांना त्यांच्या वडिलांच्या…