Headlines

कलकत्ता न्यायालयाने म्हटले-बकरी ईदला गाईची कुर्बानी आवश्यक नाही:बंगालमध्ये पशुवध नोटिशीवर बंदी घालण्यास नकार; हुमायू कबीर म्हणाले- कुर्बानी देणार

कलकत्ता उच्च न्यायालयाने बकरीदपूर्वी पश्चिम बंगाल सरकारच्या पशुवध मार्गदर्शक तत्त्वांवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने गुरुवारी सांगितले की, आवश्यक फिटनेस प्रमाणपत्राशिवाय गाय, म्हैस, बैल किंवा वासराचा वध करता येणार नाही. मुख्य न्यायाधीश सुजय पॉल आणि न्यायमूर्ती पार्थ सारथी यांच्या खंडपीठाने सांगितले की, खुल्या सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्राण्याचा वध करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या…

Read More

महापौरांना मुंबईपेक्षा ढाकामध्ये काय चाललंय यात जास्त रस:मॅनहोल दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंचा भाजप आणि रितू तावडेंवर कडाडून हल्ला

मुंबईत मुसळधार पावसात थेट महापौर रितू तावडे यांच्या डोळ्यांदेखत एक नागरिक उघड्या मॅनहोलमध्ये कोसळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून महापौर आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “सध्याच्या महापौरांना मुंबईत काय चाललंय, यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय…

Read More

एमआयटी डब्ल्यूपीयूत 'विश्वनोव्हा 2026' चे आयोजन:कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर; देशभरातून 700 हून अधिक संघांचा सहभाग

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे ‘विश्वनोव्हा २०२६’ या बौद्धिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातून ७०० हून अधिक संघांमधील ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्यावहारिक उपयुक्तता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अंतर्भाव करणे आधुनिक युगात अपरिहार्य असल्याचे मत अ‍ॅक्सेचरचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहोत्रा यांनी व्यक्त केले. ‘विश्वनोव्हा २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

मुळा धरणातील बोट नादुरुस्त, तीन गावांचा राहुरीशी संपर्क तुटला:९० लाख रुपयांचा निधी मंजूर होऊनही ५ वर्षांत बोट मिळेना‎

प्रतिनिधी | राहुरी मुळा धरणाच्या जलाशयातून तीन गावांना जोडणारी बारागांव नांदूर धक्का ते जांभळी धक्का दरम्यान चालणारी प्रवासी यांत्रिक बोट नादुरुस्त झाली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून धरणाच्या पलीकडील वावरथ, जांभळी आणि जांभुळबन या तीन गावांमधील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे. मागील चार दिवसांपूर्वी या यांत्रिक बोटीचा गिअर बॉक्स तुटल्याने ही सेवा…

Read More

पुण्यात स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेच्या कामाला सुरुवात:पहिल्या 'सेगमेंट कास्टिंग'चे उद्घाटन, वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत

पुणे शहरातील बहुप्रतीक्षित स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेच्या पहिल्या ‘सेगमेंट कास्टिंग’च्या कामाला मंगळवारी सुरुवात झाली. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे या विस्तारित मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला आता गती मिळणार आहे. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग दक्षिण पुण्याला शहराच्या मुख्य भागाशी जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गिकेचे काम सुरू…

Read More

Census 2027 Notification | Home Ministry Finalizes 40 Questions List

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केंद्र सरकारने जनगणना-2027 साठी 40 प्रश्नांची यादी जाहीर केली आहे. यात लोकांना SC, ST किंवा इतर जातीबद्दल विचारले जाईल. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सर्व समुदायांच्या जातीची माहिती जनगणनेत नोंदवली जाईल. यापूर्वी 2011 च्या जनगणनेच्या फॉर्ममध्ये 29 प्रश्न होते. यात जातीशी संबंधित माहितीसाठी फक्त SC/ST चा पर्याय होता. आता जनगणना-2027 च्या प्रश्नांच्या यादीत…

Read More

शहनाज गिलसोबत शूटिंगदरम्यान अपघात:चुकीने गिळली नाकातील नथ; सहकलाकार सौरभ सचदेवाने येऊन सांभाळले

अभिनेत्री शहनाज गिल एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान अपघाताला बळी पडल्या. सेटवर धावताना त्यांच्या नाकातील नथ अचानक तोंडात गेली, जी त्यांनी चुकून गिळली. शहनाजने या संपूर्ण घटनेचा एक बिहाइंड द सीन्स व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. मात्र या घटनेनंतरही शहनाजने आपले शूटिंग थांबवले नाही आणि काम पूर्ण केले. सीनदरम्यान धावत होती शहनाज शहनाज गिलने शेअर…

Read More

'अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय तुमच्या बापाची जहागीर आहे का?':रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर जोरदार पलटवार; महाराष्ट्रात राजकारण तापले

राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संघटनांनी तसेच विरोधी पक्षांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ठिकठिकाणी सत्याग्रह आंदोलन केले. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून कॉकरोच जनता पार्टीवर तसेच या आंदोलकांवर टीका केली जात आहे. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत, बापाचा माल आहे का? अशा शब्दांत भाजप नेते…

Read More

नसरापूर चिमुकली अत्याचार-खून प्रकरणाचा आज अंतिम फैसला:राज्यातील सर्वात वेगवान खटला ठरण्याची शक्यता

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण खून प्रकरणाचा अंतिम निकाल आज, 25 जून रोजी जाहीर होणार आहे. हा खटला राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील आजवरचा सर्वात जलदगतीने चालविलेला खटला ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या एका महिन्याच्या आतच या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन आज न्यायालय आपला अंतिम फैसला सुनावणार…

Read More

पुढच्या रीलमध्ये पंतप्रधान मोदींनी लाठीमार झालेल्या विद्यार्थिनींची माफी मागावी- दिपके:पोलिसांच्या अमानुष मारहाणीवर संताप, ‘केवळ ‘रील’पुरतीच माफी नसावी

राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी संसद भवनावर काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारावरून आता मोठा वाद पेटला आहे. याप्रकरणी अभिजित दिपके यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे पोलिस प्रशासन आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “२० जुलै रोजी झालेल्या या आंदोलनात लहान मुली आणि विद्यार्थिनींना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या निर्दयी कारवाईचा…

Read More