Headlines

टाळ-मृदंगाचा निनाद अन् नामघोषाने कोपरगाव विठ्ठलमय:संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी

वारकरी पोशाख, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात उंच डोलणाऱ्या भगव्या पताका, टाळांचा गजर आणि लेझीमच्या निनादात संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोपरगाव शहरातून विठ्ठल-नामाचा जयघोष करत दिंडी काढली. या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी संपूर्ण कोपरगावकरांना पंढरपूरच्या वारीची प्रत्यक्ष अनुभूती घडवून आणली. वारीच्या भक्ती रंगात रंगण्यासोबतच विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवर फलक हाती घेऊन शहरात मोठी जनजागृतीही केली….

Read More

राज्याला पुन्हा झोडपणार:गुजरात ते कर्नाटक कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मुंबई, कोकण अन् कोल्हापूरला यलो अलर्ट

राज्यात पावसाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातपासून ते थेट कर्नाटकपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील मान्सून अधिकच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील २ ते ३ दिवस पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथा परिसर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टीवर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात…

Read More

'पेपरफुटी'ची तुलना थेट 'आंबा चोरी'शी!:चंद्रकांत पाटलांचे वादग्रस्त विधान, हर्षवर्धन सपकाळ, अमित ठाकरेंचा संताप; नेमके काय म्हणाले?

महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘पेपरफुटी’ची तुलना थेट ‘आंबा चोरी’शी केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या धक्कादायक वक्तव्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक…

Read More

ज्येष्ठ पत्रकार नागनाथ फटाले यांना ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार:रविवारी साईबनमध्ये सोहळा, सिंधु फटाले यांना ‘मातृशक्ती सन्मान’‎

ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि स्वातंत्र्य चळवळीतील सत्याग्रही नागनाथ फटाले यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त (नवती सोहळा) मानकन्हैय्या ट्रस्टच्यावतीने त्यांना ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ तर त्यांच्या पत्नी सिंधु फटाले यांच्या ८६ व्या पदार्पनानिमित्त त्यांना ‘मातृशक्ती सन्मान’ प्रदान करण्यात येत आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी दिली. हा संयुक्त नवती व सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा रविवारी…

Read More

दोन महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्याचा चावा, ‘रेबीज’ने बालकाचा मृत्यू:एक तपाने मुलगा झाला, तोही गेला, वडील कॅन्सरच्या दुसऱ्या स्टेजमध्ये

भवानी पेठेतील ज्योती अन् योगिराज स्वामी या दाम्पत्याला लग्नानंतर एका तपाने मुलगा झाला. कोडकौतुकाने वाढला. शाळेत चालला. परंतु दोन महिन्यांपूर्वी त्याला भटक्या कुत्र्याने चावले. ही बाब त्याने आई, वडिलांना सांगितलीच नाही. दोन दिवसांपूर्वी त्याला त्रास सुरू झाला. जीभ बाहेर काढत होता.त्यातून लाळ गळत होती.हात-पाय वाकडे करून तो निपचित पडत होता. श्वानाप्रमाणे गुरगुरत होता.त्याला ‘रेबीज’ झाल्याचे…

Read More

दमदार पावसाची प्रतीक्षा:मागील नऊ दिवसांत मराठवाड्यातील धरणसाठ्यात केवळ 0.18 टक्के वाढ

मराठवाड्यात मागील आठवडाभरात झालेल्या पावसानंतरही ४४ धरणे व मोठ्या प्रकल्पांमधील ३१.७० टक्के पाणीसाठा कायम आहे. मागील ९ दिवसांत या धरणांमध्ये केवळ ०.१८ टक्के पाणीसाठा वाढला आहे. जायकवाडी आणि इसापूर या धरणांचा साठा वाढला, तर ६ धरणांचा साठा १ ते २ टक्क्यांनी घटला आहे. मराठवाड्यात जुलै महिन्याच्या शेवटचा आठवडा येऊनही दमदार पाऊस नसल्याने भविष्यात पाणी प्रश्‍न…

Read More

धर्मेंद्र प्रधान हेच पेपरफुटीचे मुख्य आरोपी:राजीनामा द्यावाच लागेल, संजय राऊतांचा केंद्रावर हल्लाबोल

नीट पेपरफुटी प्रकरण आणि देशभरात उफाळून आलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पेपरफुटीचे मुख्य आरोपी ठरवत त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी केली. तसेच, राज्यातील वाढता जनक्षोभ पाहता मंत्री, खासदार आणि विशेषतः ‘गद्दार’ आमदारांनी घराबाहेर पडू नये, असा…

Read More

'मोर्चाला गालबोट लावल्यास समारंभपूर्वक पाहुणचार करू':तिरंगा मोर्चापूर्वी राज ठाकरेंचा इशारा, 'शिवतीर्थ'वर महत्त्वाची बैठक

नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ राज आणि उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, या दोन्ही नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी मुंबईत एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी राज ठाकरे यांनी शनिवारी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी शहराध्यक्ष, सर्व विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. तसेच सोशल मीडियावर…

Read More

दिलासादायक:अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 44,648 शेतकऱ्यांना मिळणार लाभ

महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ जून २०२६ रोजी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६’ ची ऐतिहासिक घोषणा केली आहे. या शासन निर्णयाच्या आधारे लातूर जिल्ह्यातील तब्बल ४४,६४८ पात्र शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती आणि अर्थसहाय्याचा थेट लाभ मिळणार आहे. मात्र, जो शेतकरी योजनेच्या निकषात बसत नाही त्याला शासन स्तरावरून कमी करण्यात येणार आहे. जिल्हा…

Read More

दिल्ली लाठीहल्ला निषेधार्थ कँडल मार्च:आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन‎

जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या तरुणांवर झालेल्या कथित अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी लातूर शहरात कॅंडल मार्च काढून निषेध नोंदवण्यात आला. काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा कॅंडल मार्च काढण्यात आला, यावेळी आमदार देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख याही या मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. लातूर शहरातील नीट पेपरफुटी प्रकरणातील…

Read More