वारकरी संप्रदायावर शरद पवारांचे भाष्य:चळवळीत प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचे म्हणत चिंता व्यक्त
शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत महत्त्वपूर्ण आणि चर्चेत येईल असे विधान केले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रवृत्तीमुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली….