Headlines

आषाढी वारी:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, नाना‎पटोले आजपासून पंढरपुरात‎

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आषाढी यात्रेच्या तयारीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी रविवार ( दि. १९) रोजी पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. गेल्या ५ वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी यात्रेपूर्वी पंढरपुरात येऊन यात्रेच्या नियोजनाची पाहणी करतात आणि आढावा बैठक घेतात. येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा संपन्न होत आहे. पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील पूर्वतयारी, पाहणी आणि…

Read More

अपघात मुक्तवारी:माऊलींच्या पालखीसाठी नातेपुतेमध्ये 1400 पोलिसांचा बंदोबस्त

माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १९ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे प्रवेश करणार आहे. जिल्ह्यातील पहिला मुक्काम नातेपुते या ठिकाणी असणार आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेची पाहणी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनी विशाल वायकर यांनी धर्मपुरी स्वागत, कारुंडे विसावा, मोरोची, जिजाऊ…

Read More

उत्सव:'ज्ञानोबा-तुकाराम'च्या जयघोषात संत गुलाबराव महाराज पालखीचे कुर्डुवाडीत उत्साहात आगमन

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या चांदूरबाजार येथील श्री संत गुलाबराव महाराज पालखी दिंडीचे सायंकाळी कुर्डुवाडी शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च् या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. या पालखी दिंडीच्या कुर्डूवाडी येथील मुक्कामाचे हे ३७ वे वर्ष आहे. शहरात पालखीचे आगमन होताच, वागळे दवाखान्यासमोर कुर्डुवाडीच्या नगराध्यक्षा जयश्री…

Read More

दिलासा:दुबार पेरणीचे संकट टळले, बार्शी तालुक्यामध्ये 66 टक्क्यांवर पेरा

गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने चिंतेत सापडलेल्या बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना गुरुवारी आणि शुक्रवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला. बार्शी शहर, वैरागसह तालुक्यातील विविध भागांत मध्यम ते दमदार स्वरूपाचा पाऊस झाल्याने शेतशिवारात पुन्हा ओलावा निर्माण झाला असून करपण्याच्या मार्गावर असलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य फुलले आहे. यंदाच्या…

Read More

दिव्य मराठी विशेष:रोज 13-14 तास अभ्यास करत मिळवले 642 गुण

फर्स्ट पर्सन, प्रसून कथले, विद्यार्थी नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या बातम्या जेव्हा देशभरात गाजू लागल्या, तेव्हा माझ्या मनातही एक मोठा धक्का बसला होता. माझे वास्तव्य अकोला शहरातील मलकापूर परिसरात आहे. यापूर्वी झालेल्या नीटच्या परीक्षेत मला ६९० गुण मिळाले होते, त्यामुळे मी खूप आनंदित होतो. मात्र, देशभर झालेल्या पेपरफुटीच्या गोंधळामुळे ती परीक्षा रद्द झाली आणि पुन्हा परीक्षा घेण्याचा…

Read More

स्वरा भास्कर म्हणाली- सरकार निर्लज्जासारखी नग्न:CJP आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सेलिब्रिटींना म्हणाली- माझ्यासोबत जे घडले, त्यांना त्याची भीती

अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी नुकतेच जंतर-मंतर येथे पोहोचून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. यावेळी अभिनेत्रीने सध्याच्या सरकारवर जोरदार संताप व्यक्त केला. त्यांनी असेही म्हटले की, अनेक सेलिब्रिटी या प्रकरणी गप्प आहेत, कारण त्यांना भीती आहे की त्यांच्यासोबतही तेच होईल जे स्वरासोबत झाले. जंतर-मंतर येथे लल्लनटॉपशी बोलताना स्वरा यांनी…

Read More

पालकमंत्र्यांचा संताप:1639 शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रशासन जागे; पाच कंपन्यांविरोधात 70 गुन्हे दाखलचे आदेश

जिल्ह्यात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे लाखो शेतकऱ्यांचा हंगाम धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शुक्रवारी (दि. १७) संतप्त वातावरण पाहायला मिळाले. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एक नव्हे तर पाचही बियाणे कंपन्यांविरोधात जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये प्रत्येकी गुन्हे दाखल करून शुक्रवारी रात्रीपर्यंतच एकूण ७० एफआयआर नोंदवावेत, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाला दिले. याचवेळी गुन्हे…

Read More

पावसाचे 30 पैकी 25 यलो अलर्ट "फेल':चापडोह धरणातही पाणीसाठा कमी, जोरदार पाऊस न झाल्यास पाण्याची समस्या होणार गंभीर‎

यंदा पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात तब्बल ३० वेळा यलो पावसाचा अलर्ट देण्यात आला. मात्र यापैकी एकाही दिवशी पाऊस बरसला नाही. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा आणि चापडोह या दोन्ही धरणांमध्ये क्षमतेच्या केवळ ८० टक्के पाण्याचा साठा शिल्लक राहिला आहे. सध्या सुरू असलेली पावसाची तूट अशीच कायम राहिल्यास शहरात येत्या…

Read More

‘त्या’ चालकाची हत्या करून ट्रक पेटवून दिला; गूढ उकलण्यात यश:दोघे ताब्यात : एकाला गुजरात तर दुसऱ्याला रावेरमधून अटक

मोर्शी-चांदूरबाजार मार्गावरील चिखलसावंगी फाट्याजवळ जळालेल्या ट्रकमध्ये सापडलेल्या मृतदेहाचे गूढ ग्रामिण पोलिसांनी २४ तासात उकलले आहे. हा अपघात नसून ट्रकचालकाची हत्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, आर्थिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मृतकाची ओळख चंद्रपूर येथील ट्रकचालक उमेश गौरीशंकर…

Read More

अकोटच्या कालंका माता मंदिर चोरी प्रकरणाचा छडा:गुन्हे शाखेचा पोलिस महासंचालकांकडून सन्मान

अकोट येथील सुप्रसिद्ध कालंका माता मंदिरात झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या प्रकरणाचा तपास केल्याबद्दल राज्याच्या पोलिस महासंचालकांनी मुंबईत एलसीबीच्या अधिकारी व अंमलदारांचा सन्मान केला. पोलिसांच्या माहितीनुसार २२ फेब्रुवारी रोजी अकोटमधील बारागण येथील कालंका माता मंदिरातून अज्ञात चोराने देवीच्या मूर्तीवरील ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने व दानपेटीतील ७५० ग्रॅम चांदी,…

Read More