Headlines

राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भाला विश्रांती! तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी…

Read More

‘एसआयआर’साठी काँग्रेस पक्ष सज्ज:जिल्हाध्यक्षांद्वारे पदाधिकाऱ्यांना टिप्स

मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरु केली आहे. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत अलिकडेच काँग्रेस भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी अभियानादरम्यान घ्यावयाची काळजी आणि ही मोहीम यशस्वीरित्या पूर्णत्वास जाण्यासाठी काही टिप्स दिल्या. माजी मंत्री यशोमती ठाकूर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या नियमांचे व निर्देशांचे…

Read More

नाविन्यपूर्ण कला असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाव द्यायला हवा- डॉ. अशोक रुपनर:दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेत 50 शिक्षकांचा सहभाग‎

मुलांना प्रात्यक्षिक करायचे असतात परंतु हव्या तेवढ्या सुविधा नसतात. शाळेमध्ये घ्यायचे झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. रोजच्या वेळापत्रकामधून वेळ भेटत नाही तर सुट्टीच्या दिवशी अशा ऍक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर मुलांना सायन्स सेंटरमध्ये घेऊन जायला हवे, प्रात्यक्षिक दाखवायला हवेत. सर्वच मुले नाविन्यपूर्ण नसतात, परंतु ज्यांच्याजवळ नाविन्यपूर्ण कला आहे त्यांना वाव द्यायला हवा, असे प्रतिपादन डॉ. अशोक…

Read More

33 पालख्या अन् 204 दिंड्याचे माढा तालुक्यामध्ये होणार स्वागत:मराठवाड्याचे प्रवेशद्वार वैष्णवांच्या मेळ्यासाठी सज्ज; कुर्डुवाडीत भाविकांची लगबग

कुर्डुवाडी हे रेल्वेचे जंक्शन असून मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा यांना जोडणाऱ्या कुर्डुवाडी शहरात व परिसरात आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या दिंड्या पालखी सोहळ्यांच्या स्वागतासाठी तालुका व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आषाढी वारी आता काही दिवसांवर आली असून माढा तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या ३३ पालख्या व २०४ दिंड्यांच्या स्वागतासाठी येथील शासकीय यंत्रणा…

Read More

भूकंपाच्या सलग 4 धक्क्यांनी हिंगोली जिल्हा हादरला:शिरली परिसरात 4.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेमुळे नागरिकांची रात्र जागून, अनेक घरांना तडे

हिंगोली जिल्ह्यात गुरुवारी ता. 9 पहाटे अवघ्या दोन तासात चार भूकंपाच्या धक्याने जिल्हा हादरला असून शिरळी परिसरात 4.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षापासून भूकंपाची मालिकाच सुरु आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरीक भयभित झाले आहेत. गुरुवारी ता. 9 पहाटे 1 वाजून 37 मिनिटांनी 4.6…

Read More

आषाढी यात्रा काळात पावसाची शक्यता; यंदा 20 पर्यायी पत्राशेड:जर्मन हँगर मंडप, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची भाविकांच्या दर्शन रांगेची तयारी‎

यंदाची आषाढी एकादशी जुलै महिन्याच्या अखेरीस येत असल्याने, यात्रेदरम्यान संभाव्य पावसाचा अंदाज घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मंदिर परिसरातील नवीन दर्शन मंडपाच्या कामामुळे दरवर . पंढरपुरात दरवर्षी आषाढी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी रिद्धी-सिद्धी गणपती दर्शन रांगेत साधारण १० ते १२ पत्राशेड उभारले जातात. परंतु, यंदा…

Read More

आंदोलन:जिल्ह्यात कुठेही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही, वेळ पडल्यास जेलमध्ये जाऊ- खासदार लंके

राज्य सरकार एकीकडे सांगते की स्मार्ट मीटरची सक्ती नाही, मात्र दुसरीकडे शहरात व ग्रामीण भागामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जात आहेत. हा प्रकार तातडीने बंद करा. यापुढे जिल्ह्यात कुठेही स्मार्ट मीटर बसवू देणार नाही. वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू आणि जेलमध्येही जाऊ, असा थेट आणि आक्रमक इशारा खासदार निलेश लंके यांनी…

Read More

उत्तराखंडमधील जागेश्वर आणि डोल आश्रमात पोहोचले अभिनेते राजपाल यादव:पारंपरिक भगव्या वस्त्रात दिसले, धामच्या धार्मिक महत्त्वाचे केले कौतुक

बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव आणि हेमंत पांडे यांनी अल्मोडा जिल्ह्यातील दोन प्रमुख आध्यात्मिक स्थळे जागेश्वर धाम आणि डोल आश्रमाला भेट दिली. त्यांनी या ठिकाणी दर्शन-पूजन केले आणि संतांचे आशीर्वाद घेतले. जागेश्वर धाममध्ये दोन्ही कलाकारांनी भगवान भोलेनाथांचे दर्शन घेतले आणि विधीपूर्वक पूजा-अर्चा केली. ही पूजा आचार्य निर्मल भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मंदिर परिसरात घालवलेला वेळ…

Read More

निरोगी जीवनशैलीसाठी ध्यान अन् सकारात्मक विचार आवश्यक:निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांचे प्रतिपादन, केला पर्यावरण संवर्धनाचा निर्धार‎

आजच्या धावपळीच्या जीवनात नैराश्‍य, तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही अनेक गंभीर आजारांची प्रमुख कारणे बनत आहेत. या समस्यांवर औषधांपेक्षा सकारात्मक विचार, नियमित योग, ध्यान आणि शिस्तबद्ध जीवनशैली हा अधिक प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन निसर्गोपचार तज्ज्ञ हेमा सेलोत यांनी केले. महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे, पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि प्रत्येक…

Read More

भूमिगत केबलमध्ये बिघाड, सावेडी उपनगरात 14 तासांवर वीज खंडित:पाण्यावाचून नागरिकांचे हाल, विजेअभावी व्यवसायही ठप्प‎

सावेडी उपनगर परिसरातील प्रोफेसर चौक परिसरात बुधवारी महावितरण कंपनीच्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाल्याने प्रोफेसर चौक फिडरवर अवलंबून असलेल्या अनेक वसाहतींमधील वीज पुरवठा तब्बल १४ तासांपेक्षा अधिक काळ बंद होता. विजेअभावी नागरिक विशेषतः गृहिणींच्या दैनंद . गेल्या दोन दिवसांपासून शहरात सतत पाऊस सुरू आहे. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास पाऊस पडत असताना सावेडी उपनगरातील वीजपुरवठा खंडित झाला….

Read More