दुष्काळाचे सावट:अकोलेकरांवर पाण्याचे संकट; महान धरणात 25% जलसाठा, अकोला, मूर्तिजापूरसह 64 गावांना पाणीपुरवठ्याची चिंता
अकोला शहरासह मूर्तिजापूर आणि ग्रामीण भागाची तहान भागवणाऱ्या महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने दडी मारल्याने धरणातील जलसाठा अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी धरणात केवळ २४.९१ टक्केच उपयुक्त जलसाठा शिल्लक असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट नोंदवण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस वेगाने उलटत असतानाही धरणाची पाणीपातळी वाढत नसल्याने आगामी काळात…