Headlines

मूलभूत प्रश्नांसाठी गोळशी फाट्यावर रास्ता रोको:रेशनकार्ड, पाणीटंचाई व आरोग्य सुविधेबाबत भूमिपुत्र एल्गार संघटना आक्रमक, उपाययाेजन करण्याचे आश्वासन‎

दिंडोरी व पेठ तालुक्यातील जनतेच्या प्रलंबित मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने दखल न घेतल्याने भूमिपुत्र एल्गार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर कनोजे यांच्या नेतृत्त्वाखाली नाशिक – पेठ रस्त्यावरील गोळशी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. नायब तहसीलदार चैताली . यावेळी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात होता. आंदोलनात उत्तमराव चौरे, संतोष भोई, सरपंच तुकाराम चोथवे, लक्ष्मण जाधव,…

Read More

पैठण उद्यानातील संगीत कारंजे बंद होण्याची शक्यता:स्वच्छताही रखडली, स्थानिक अधिकारी हतबल, वरिष्ठांचे दुर्लक्ष, अपुऱ्या मनुष्यबळाचा परिणाम‎

पैठण येथील ३१० एकर क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर उद्यान ‘दिव्य मराठी’च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पुन्हा सुरू झाले आहे. तरी सध्या उद्यानातील व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज हजारो पर्यटक उद्यानाला भेट देत असताना, मूलभूत सुविधांचा अभाव आणि . पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या या उद्यानाकडे संभाजीनगर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उद्यान विकास समितीने केला आहे….

Read More

मोबाइलपासून पालकांनी विद्यार्थ्यांना दूर ठेवणे गरजेचे:मंठा येथील पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांचे प्रतिपादन

मोबाईलचा अतिरेक लहान मुलांमध्ये एकाग्रतेचा अभाव निर्माण करतो. मानसिक तणाव वाढतो. सोशल आयसोलेशन होते. शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. ‘मोबाईल ही सोय आहे, गरज होऊ नये,’ अशी जाणीव पालक व शिक्षकांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. मुलांमधील मोबाईलचे व्यसन कमी करण्यासाठी पालकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे मत पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांनी व्यक्त केले. अशोका…

Read More

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर देवगाव रंगारीत पंचमी उत्सवाचे मेढ पूजन:नरसिंह जयंतीला होणार बोहडा समाप्ती, सोंग काढून होणार उत्सवाची सांगता‎

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे भगवान नृसिंह जन्मोत्सवानिमित्त वार्षिक सोंगाच्या पंचमी उत्सवाची मेढ पूजन अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर १९ रोजी झाले. शिवसेना उपतालुकाप्रमुख गोकुळ गोरे, ग्रामपंचायत सदस्य ललित सुराशे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचाल . पाच दिवसांत सुरुवात विदूषक, गणपती, सरस्वतीच्या सोंगाने होते. राम-लक्ष्मण, वेताळ, बाळंतीण, रेणुकामाता, कालिकामाता, शंकर-पार्वती, संतोषीमाता, रावण, वानर ताटी, खंडोबा, वीरभद्र, तुळजाभवानी,…

Read More

प्रशांत महासागरातील एल निनो यंदा आपल्या नळाचे 15% पाणी पळवणार:ऑगस्टअखेरपर्यंत पावसाच्या खंडाची चिन्हे म्हणून सर्व शहरांत 15% पाणी कपात करा

राज्यावर यंदा ‘एल निनो’चे संकट घोंगावत आहे. जूनमध्ये हजेरी लावून पावसाला ऑगस्टपर्यंत खंड पडू शकतो, अशी चिन्हे आहेत. म्हणून सरकारने एल निनोशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच मनपांना पत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी 15% पाणी कपातीच्या सूचना दिल्या आहेत. ‘एल निनो’चा परिणाम शेती, उद्योग आणि बांधकामावर…

Read More

संभाजीनगरात युतीच्या नगरसेवकांना 80 लाख:तर एमआयएमला फक्त 35 लाख निधी, अर्थसंकल्प सादर; युतीच्या नगरसेवकांसाठी मनपाची तिजोरी उघडली

स्थायी समितीने 2026-27 च्या अर्थसंकल्पात 130 कोटी रुपयांची वाढ सुचवत सत्ताधारी भाजप, शिंदे गटाच्या नगरसेवकांसाठी महापालिकेची तिजोरी खुली केली आहे. एका बाजूला भाजप नगरसेवकांना 80 लाखांचा भरघोस निधी दिला. मात्र एमआयएमच्या नगरसेवकांना 35 लाख, तर उद्धवसेनेच्या नगरसेवकांना 55 लाखांचा निधी दिला. स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी सादर केलेल्या 3,354 कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पात भाजपच्या एका…

Read More

नव्या व्हिडिओत अयानकडे थार, पिस्तुलासह नोटा बंडले:अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेल केल्याचा संशय

अमरावतीतील अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन प्रकरण अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून मोठी खंडणी उकळण्याचे किंवा ‘हनी-ट्रॅप’चे हे एक संघटित रॅकेट असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आरोपी अयान अहमद एका नव्या व्हिडिओत एका आलिशान ‘महिंद्रा थार’ गाडीत बसलेला दिसत आहे. त्याच्या शेजारी महागडे मोबाइल, पिस्तूलसदृश शस्त्र आणि नोटांचे मोठे बंडल आहे. एका साध्या तरुणाकडे एवढी मोठी रोकड…

Read More

पालखी मार्गावरील कामांच्या 1303 कोटी आराखड्यापैकी 959 कोटींची कामे पूर्ण:आषाढी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून मुंबईत आढावा बैठक

येत्या २५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील विकासकामे वेगाने पूर्ण करा. यात्रेपूर्वी, यात्रेत आणि यात्रेनंतरही वारकऱ्यांना येथे येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या . या मार्गावरील विकासकामांसाठी १,३०३ कोटींच्या आराखड्यापैकी ९६४ कोटींची कामे मंजूर झाल्याचीही माहिती दिली. मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आषाढी यात्रेच्या तयारीची आढावा…

Read More

मुंबई 3.0…शेतकऱ्यांच्या भागीदारीतून साकारणार आधुनिक ‘थीमॅटिक सिटी’:2 लाख रोजगार; जमिनीच्या बदल्यात 22.5% विकसित भूखंडाचा पर्याय

मुंबई आणि नवी मुंबईनंतर आता महानगर प्रदेशाचा (एमएमआर) चेहरामोहरा बदलणाऱ्या ‘मुंबई ३.०’ (तिसरी मुंबई) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ‘एमएमआरडीए’ने अत्यंत क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जमिनीच्या बदल्यात केवळ रोख मोबदला देण्याची जुनी पद्धत मोडीत काढत, प्रशासनाने आता ‘सहभागात्मक मॉडेल’ लागू केले आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी आता केवळ ‘प्रकल्पग्रस्त’ न राहता, थेट या जागतिक दर्जाच्या शहरनिर्मितीचे ‘भागीदार’…

Read More

जमिनीचे ‘एनए’ करण्यासाठी आता ऑनलाइन प्रणाली सुरू:हेलपाटे वाचणार, महसूलमंत्र्यांच्या हस्ते प्रणालीचे उद्घाटन

राज्य सरकारने अकृषिक (एनए-नॉन ॲग्रिकल्चरल) जमीन रूपांतरणाची प्रक्रिया आता अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक केली आहे. नागरिकांना आता जमीन ‘एनए’ करण्याचे शुल्क (प्रीमियम) ऑनलाइन भरता येणार असून, ही सुविधा ‘बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम’शी (बीपीएमएस) जोडण्यात आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी मंत्रालयात या अद्ययावत ‘बीपीएमएस’ प्रणालीचे उद्घाटन केले. या नव्या सुविधेमुळे बांधकाम परवानग्या आणि…

Read More