Headlines

लाडगाव ते वांजरगाव रस्त्यावर कावड यात्रेच्या 20 भाविकांचा टेम्पो उलटला:4 गंभीर जखमी घाटीत, सर्वजण कन्नड तालुक्यातील औराळ्याचे रहिवासी‎

पवित्र पाणी घेऊन पिनाकेश्वर महादेवाच्या डोंगराकडे निघालेल्या भाविकांच्या कावड यात्रेला रविवारी सकाळी अपघाताचे गालबोट लागले. लाडगाव-वांजरगाव रस्त्यावर भाविकांना घेऊन जाणारा टेम्पो उलटल्याने नऊ भाविक जखमी झाले. त्यापैकी चौघांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. औराळा (ता. कन्नड) येथील २० भाविक वांजरगाव येथे पाणी घेण्यासाठी आले होते. तेथून हे पवित्र पाणी घेऊन नाशिक जिल्ह्यातील…

Read More

न्यूयॉर्कमध्ये भागवतांच्या कार्यक्रमापूर्वी तिरंग्याचा अपमान:रिजिजूंचा इशारा- RSS, भाजपवर टीका करा, पण देशाचा अपमान महागात पडेल

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी न्यूयॉर्कमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणाबाहेर भारतीय ध्वजाच्या अपमानावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रदर्शन शनिवारी मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर झाले होते. रिजिजू यांनी रविवारी रात्री X वर घटनेचा व्हिडिओ शेअर करत लिहिले- आम्ही नेहमीच म्हटले आहे की आरएसएस, भाजप किंवा सरकारवर टीका करण्याचे स्वातंत्र्य आहे, पण आमच्या ध्वजाचा आणि…

Read More

उमराणे प्राथमिक शाळेला दीड लाखांचे साहित्य भेट:गेट-टुगेदरचा खर्च टाळून माजी विद्यार्थ्यांनी दिला स्मार्ट टीव्ही, साऊंड सिस्टीम, सीसीटीव्ही‎

माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या नावाखाली हॉटेल, रिसॉर्टमध्ये हजारो रुपये खर्च करतात. मात्र, या प्रथेला फाटा देत सामाजिक बांधिलकी जपत उमराणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या २००८-०९ च्या इयत्ता दहावीच्या ५० माजी विद्यार्थ्यांनी शाळेला सुमारे दीड . जिल्हा शिक्षण अधिकारी ओमप्रकाश पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निधी संकलित केला. त्यातून स्मार्ट टीव्ही, साऊंड…

Read More

शेतकरी वाचवणे हाच सर्वांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असावा:विनायकदादा पाटील प्रतिष्ठानच्या शुभारंभप्रसंगी खा. सुळे यांचे प्रतिपादन‎

‘राजकारण होत राहील, मतभेदही होतील; मात्र शेतकऱ्यांना वाचवणे हाच सर्वांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असला पाहिजे,’ असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. विनायकदादा पाटील यांची नाळ काळ्या मातीशी जोडलेली होती. त्यामुळे कांदा उत्पादकांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. वनाधिपती विनायकदादा पाटील प्रतिष्ठानच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. निफाड तालुक्याच्या राजकीय,…

Read More

चांदवडमध्ये ईद-ए-मिलाद मिरवणुकीत एकतेचा संदेश:शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे‎

ईद-ए-मिलाद सण चांदवड शहरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध भागांत आकर्षक धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. मुस्लीमबहुल मोहल्ले, घरे आणि दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जामा मस्जिद परिसरातून ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणूक सोमवार पेठ, शिवनेरी चौक, नाईकवाडा, पुरा, मुल्लावाडा, शिवनेरी…

Read More

श्रीकृष्णाच्या लीलांतून मोह, लोभाचा त्याग करून मानवतेने जगाचा संदेश:मानूर येथील कीर्तन सप्ताहात प्रकाश महाराज गांगुर्डे यांचे निरुपण‎

भगवान श्रीकृष्णाने विविध लीलांच्या माध्यमातून कुप्रवृत्तीचा नाश करत मानवाला संकटांना सकारात्मक वृत्तीने सामोरे जाण्याचा आणि हसत-खेळत जीवन जगण्याचा मूलमंत्र दिला. त्यामुळे माणसाने मोह-माया व लोभापासून दूर राहून एकमेकांना सहाय्य करणारे जीवन जगावे, असा . श्रीकृष्ण भगवंताचे स्वरूप असतानाही त्यांनी जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षमय जीवन जगले. अखेर त्यांनाही या जगाचा निरोप घ्यावा लागला. त्यामुळे भगवंताच्या स्वरूपालाही…

Read More

सैनिकांच्या मनगटावर विद्यार्थ्यांची राखी:जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर पाेहाेचल्या राख्या; नांदगावच्या न्यू इंग्लिश स्कूलचा उपक्रम‎

देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथील विद्यार्थी आणि शिक्षिकांनी स्वहस्ते सुंदर राख्या तयार करून जम्मू-काश्मीरमधील लष्करी तळावर पाठवल्या. रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी सकाळीच या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा हा उपक्रम भावनिक ठरला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संयुक्त उपक्रम राबविण्यात आला. ‘आपण…

Read More

निष्ठावान शिवसैनिक हाच उबाठाचा श्वास:चांदवड येथील आढावा बैठकीत माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी साधला संवाद‎

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षाने चांदवड तालुक्यात संघटनात्मक बांधणीला वेग देत बूथ पातळीवरील यंत्रणा मजबूत करण्याचा निर्णय घेतला. तळागाळातील मतदारांशी थेट संवाद वाढविण्यासाठी ‘बूथ लेव्हल एजंट’ (बीएलए) यंत्रणा सक्षम करण्यावर आढावा बैठकीत चर्चा झाली. माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. मिर्लेकर म्हणाले की, निष्ठावान शिवसैनिक हाच पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा…

Read More

थकबाकीदारांना व्यवसायाची मुभा, रक्कम भरलेल्या गाळेधारकांना ताब्याची प्रतीक्षा:घाेटी ग्रामपालिकेच्या गाळे लिलावाच्या प्रक्रियेवर स्थानिक ग्रामस्थांचा संताप‎

येथील ग्रामपालिकेच्या मटण, चिकन व मच्छी मार्केटमधील गाळ्यांच्या वाटपाचा आणि आर्थिक व्यवहाराचा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. एका बाजूला लिलावाची अनामत रक्कम तसेच भाडे थकीत असतानाही तब्बल १५ गाळेधारक गाळ्यांमध्ये व्यवसाय करत असल्याचा आरोप होत आहे; तर दुसऱ . मटण, चिकन व मच्छी मार्केटमध्ये एकूण ३० गाळे असून, त्यापैकी १५ गाळेधारकांकडून लिलावाची अनामत रक्कम भरलेली…

Read More

समृद्धी महामार्गावर 16 तासांनंतर गॅस गळती रोखण्यात मिळाले यश:वाहतूक 5 तास बंद, माळीवाडा- हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून वळवली‎

गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी शिवारातील समृद्धी महामार्गालगत गट क्रमांक ८६ मध्ये शनिवारी सायंकाळी ५.१५ वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना टळली. एमएनजेपीएल या नैसर्गिक गॅस पाइपलाइनच्या मुख्य व्हॉल्व्ह पॉईंटवरील कपलिंग निघाल्यामुळे भीषण गॅस गळती सुरू झाली होती. विविध यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करत तब्बल १६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी सकाळी १० वाजता ही गळती रोखण्यात यश मिळवले आहे. रविवारी…

Read More