पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात 'इंडिया' आघाडी निदर्शनं करणार:काँग्रेसचा इशारा; जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी कडक इशारा दिला आहे की, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर आणि मोदी सरकारच्या विरोधात मतदान करून निवडून आलेल्या खासदारांनी भाजप-महायुतीत प्रवेश केल्यास तो जनतेचा विश्वासघात ठरेल. अशा परिस्थितीत, काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीचे कार्यकर्ते संबंधित खासदारांच्या घरांसमोर तीव्र निदर्शने करतील. तिवारी म्हणाले की, मोदी सरकारच्या असंवैधानिक आणि लोकशाहीविरोधी कृत्यांमुळे देशाची…