भारतीय संस्कृतीची मूल्ये जपणे काळाची गरज:उद्योजक अभय फिरोदिया यांचे प्रतिपादन, ज्ञान-परंपरेचा मिलाफ महत्त्वाचा
भारतीय संस्कृतीमधील मूल्ये म्हणजे जीवनाचे तत्वज्ञान असून ती जपणे सध्याच्या काळाची गरज आहे, असे मत फोर्स मोटर लि. चे चेअरमन आणि जागतिक किर्तीचे उद्योगपती अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले. पुण्यभूषण फौंडेशनतर्फे आयोजित एका विशेष वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यंदाच्या पुण्यभूषण पुरस्काराचे मानकरी असलेल्या ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांच्यासोबत पत्रकारांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला…