विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस:शेतकरी कर्जमाफी, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, पेपरफुटी, कायदा-सुव्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. . दरम्यान, अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले होते, तोच मुद्दा आज पाचव्या दिवशीही विरोधक लावून धरण्याची चिन्हे आहेत. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार असून,…