Headlines

9 जुलैला शिक्षकांकडून 'शाळा बंद'ची हाक:टीईटी, संचमान्यता धोरण आणि अशैक्षणिक कामांच्या विरोधात आंदोलन

शिक्षक अभियोग्यता परीक्षेमुळे (टीईटी) निर्माण झालेली सेवा विषयक अस्थिरता, पदोन्नतीची हिरावलेली संधी, संच मान्यता धोरण आणि बीएलओ नियुक्तीसंबंधीच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शिक्षकांनी ९ जुलै रोजी सामूहिक रजा घेत ‘शाळा बंद’ची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, महाराष्ट्र टीईटी/सीटीईटी उत्तीर्ण शिक्षक कृती…

Read More

'उडान'च्या पुढील टप्प्यात 28,840 कोटींची गुंतवणूक:दहा वर्षांत चार कोटी नवे प्रवासी; 120 ठिकाणे जोडणार – मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली आहे की, प्रादेशिक हवाई संपर्क योजना ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत सुमारे २८,८४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. या गुंतवणुकीमुळे पुढील दहा वर्षांत सुमारे चार कोटी नव्या प्रवाशांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, १२० नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. मोहोळ…

Read More

'मी शिवसेना सोडलेलीच नाही':पत्रकार परिषदेत सचिन अहिरांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंविरुद्ध वरळीतून लढण्यावरही दिले सूचक उत्तर

उद्धव ठाकरे यांना आठवडाभरात दुसरा मोठा राजकीय धक्का बसल्यानंतर आता या घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतल्यानंतर सचिन अहिर यांनी केलेल्या विधानांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. “मी पक्ष सोडलेलाच नाही,” असा दावा करत त्यांनी एकीकडे तांत्रिक मुद्दा…

Read More

19 ते 28 जुलैदरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव:श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात यंदा सोहळ्याचा गंगा आरतीने होणार प्रारंभ

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९व्या वर्धापन दिनानिमित्त आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दि. १९ ते २८ जुलै या कालावधीत विविध धार्मिक . श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वात संपूर्ण…

Read More

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास, पुणे महोत्सवात मत

ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे. रंगभूमी हा जिवंत आणि उत्स्फूर्त आविष्कार असल्याने एआय त्याला पर्याय ठरू शकणार नाही, असे मत त्यांनी मांडले. रावल म्हणाले की, रंगभूमीवरील उर्जेची सळसळ एआय आणू शकत नाही. तर, अनेक प्रलोभने असूनही रंगभूमीवरील प्रयोग हाऊसफुल…

Read More

दिलीप वळसे-पाटील थेट शरद पवारांच्या भेटीला:'सिल्व्हर ओक'वरुन नवे राजकीय संकेत? राष्ट्रवादीत नेमकं शिजतंय तरी काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांभोवती चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे…

Read More

दिगाव येथे पतीच्या निधनाचा धक्का असह्य:4 तासांत पत्नीनेही सोडले प्राण, पती हरी सुसुंद्रे यांचे दीर्घ आजाराने तर पत्नी भागाबाई यांचे ह्रदयविकाराने निधन‎‎

. सुख-दुःखात सोबत राहू आणि मृत्यूच्या दारातही साथ निभावू, या उक्तीची प्रचिती देणारी हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील दिगाव येथे घडली आहे. सुसुंद्रे कुटुंबातील वृद्ध पती-पत्नीचा अवघ्या चार तासांच्या अंतराने मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिगाव येथील रहिवासी हरी सांडू सुसुंद्रे (८०) यांचे गुरुवारी (९ जुलै) रात्री १० वाजेच्या सुमारास दीर्घ…

Read More

Congress May Withdraw, Unopposed Polls Likely

राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत अखेर मोठी घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असताना काँग्रेस पक्ष माघार घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे ब . काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार आज…

Read More

मुसळधार पाऊस, बळीराजा सुखावला:शहरात सायंकाळी दीड तास पाऊस बरसला‎

अकोला शहरासह जिल्हाभरात शनिवारी (दि.२७) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील विविध भागात पाणी साचले. जोराच्या पावसासह विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची भंबेरी उडाली. पावसामुळे अकोला शहरातील वीज काही काळ गेली होती. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. अकोला शहरात सायंकाळी पाचपासून साडेसहा वाजेपर्यंत सुमारे दीड तास पाऊस बरसला. त्यानंतर त्याने थोडी…

Read More

आरोग्यमंत्री आबिटकर यांचे लोहगाव रुग्णालय सुरू करण्याचे आदेश:महिन्याभरात लोकार्पण; संत तुकाराम महाराजांच्या नावाची मागणी

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रलंबित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे रुग्णालय येत्या महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज करावे, असे निर्देश त्यांनी मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित बैठकीत मंगळवारी दिले आहे. या बैठकीत लोहगाव उपजिल्हा रुग्णालयासह येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी वडगावशेरी मतदारसंघाचे…

Read More