Headlines

नीरव मोदीला बँकेला ₹108 कोटी द्यावे लागतील:वैयक्तिक कर्ज हमी प्रकरणात लंडन उच्च न्यायालयाचा निर्णय, 7 वर्षांपासून तुरुंगात आहे

फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला बँक ऑफ इंडिया (BoI) ला 1.15 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 108 कोटी रुपये द्यावे लागतील. लंडनच्या उच्च न्यायालयाने दुबईतील ‘फायरस्टार डायमंड एफजेडई’ या कंपनीसाठी दिलेल्या वैयक्तिक कर्ज हमी आणि त्यावर लागलेल्या व्याजाशी संबंधित प्रकरणात हा निर्णय दिला आहे. नीरव गेल्या 7 वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात आहे आणि भारताकडे प्रत्यार्पणाविरोधात कायदेशीर लढा…

Read More

हिंगोली पालिकेत राष्ट्रवादीला झटका:तिसरे अपत्य असल्यामुळे नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

तिसरे अपत्य असल्याच्या कारणावरून हिंगोली नगर परिषदेच्या राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) नगरसेविका रुबीना मोहम्मद वाजीद यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्य पदासाठी अपात्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता २४ रोजी निर्णय दिला असून, यामुळे रुबीना वाजीद यांचे नगर परिषदेतील सदस्य पद तात्काळ प्रभावाने रिक्त झाले आहे. हिंगोली येथील प्रभाग क्र. १३ मधील रहिवासी सय्यद…

Read More

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही:वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्यात यावे. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने…

Read More

Noel Tata Steps Down as Trent Chairman; Company Has 1286 Stores

मुंबई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नोएल टाटा यांनी मंगळवारी, म्हणजेच 23 जून रोजी, कंपनीच्या 74व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांना संबोधित करताना सांगितले, “तुम्हाला माहीत असेलच की, अध्यक्ष म्हणून ही माझी शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा असेल.” वेस्टसाइड आणि झुडिओ यांसारख्या मोठ्या फॅशन ब्रँड्सचे संचालन करणाऱ्या टाटा समूहाची कंपनी ‘ट्रेंट’च्या अध्यक्षपदावरून नोएल टाटा यांचे पायउतार होणे हा…

Read More

अरविंद सावंत आणि अनिल देसाईंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट:शिवसेना ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांवर योग्य कारवाई करण्याची मागणी

शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदार फुटले असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. या 6 खासदारांनी जेव्हा बंड पुकारले होते तेव्हा शिवसेना ठाकरे गटाने महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला 6 खासदार गैरहजर होते. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली….

Read More

वर्क फ्रॉम होम बहाण्याने तरुणाला ४ लाखांचा गंडा:ऑनलाईन चित्रपट रेटिंगच्या आमिषाने फसवणूक

पुण्यात ‘वर्क फ्रॉम होम’च्या आमिषाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. ऑनलाईन चित्रपट आणि व्हिडिओंना रेटिंग देऊन पैसे कमवण्याचे आमिष दाखवून एका आयटी प्रोफेशनला ४ लाख ९ हजार ५०० रुपयांची फसवणूक करण्यात आली, तर दुसऱ्या घटनेत टेलिग्रामवरील टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने एका नागरिकाला २ लाख ८७ हजार ७१९ रुपयांना गंडा घातला…

Read More

हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही- तुकाराम मुंढे

राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अन्न व्यावसायिकांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे, खानावळी आणि ज्या-ज्या ठिकाणी अन्नप्रक्रिया केली…

Read More

बिडकीन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत द्या:आमदार विलास भुमरे यांची मागणी, विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित

पैठण तालुक्यातील बिडकीन येथील पाच तरुणांच्या गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूची दखल विधानसभेत घेण्यात आली. आमदार विलास भुमरे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत मृत तरुणांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली. भुमरे यांनी सांगितले की, बिडकीन गावातील १९ तरुण पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे गेले होते….

Read More

खराडीत कौटुंबिक वादातून पत्नीचा खून:पतीने धारदार शस्त्राने वार करत जीव घेतला, आरोपी फरार

पुणे शहरातील खराडी भागात कौटुंबिक वादातून एका महिलेचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी पहाटे घडली. या प्रकरणी पती दयाराम तोताराम बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तो फरार आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपास पथक रवाना केले आहे. किरण दयाराम बाबर (वय ३२, रा. भनगाई वस्ती, खराडी) असे खून…

Read More

बालगंधर्व रंगमंदिर सांस्कृतिक राजधानीचे वैभव: उल्हास पवार:58 व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व महोत्सवाचे आयोजन, मान्यवरांचा गौरव

बालगंधर्व रंगमंदिर हे पुणे शहराचे सांस्कृतिक वैभव आहे. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेले हे रंगमंदिर आता केवळ शहराचे किंवा महाराष्ट्राचे नव्हे, तर भारताच्या सांस्कृतिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी काढले. बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि पुणे महापालिकेच्या वतीने, अलविरा मोशन एंटरटेन्मेंट प्रस्तुत, बालगंधर्व रंगमंदिराच्या ५८ व्या…

Read More