इगतपुरीत 24 तासांमध्ये 150 मिमी; विजेचे खांब पडले:30 गावे अंधारात, वाडीवऱ्हे, वैतारणा, साकूर परिसरात विविध ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या
. इगतपुरी तालुक्यात २४ तासांत १५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील एकूण पर्जन्यमान १,४५९ मिमीवर पोहोचले आहे. पावसासोबत सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे वाडीवऱ्हे, वैतारणा, साकूर परिसरात महावितरणच्या यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे ३० ते ३५ गावांत १ विजपुरवठा खंडित झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे अनेक विद्युत पोल जमीनदोस्त झाले आहेत, तर…