ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमधील बाधित 35 शेतकऱ्यांना धनादेश वाटप
ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामामुळे बाधित झालेल्या फळबागांच्या कृषी मूल्यांकनाचा मोबदला अखेर शेतकऱ्यांना मिळाला आहे. आमदार विलास भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे खादगाव, सुलतानपूर, सोनवडी, गाव तांडा, खेर्डा, मोती तांडा आणि दावरवाडी आदी गावांतील ३५ बाधित शेतकऱ्यांना रविवारी कृषी मूल्यांकनाच्या मोबदल्याचे धनादेश वितरित करण्यात आले. जलसंपदा विभागामार्फत या योजनेअंतर्गत बंद नलिका वितरण प्रणालीचे…