Headlines

कुटुंबात करदाता व्यक्ती असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ केला बंद:महिला व बाल कल्याण विभागाने लाभार्थींना दिली माहिती‎

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्रतेचा मुद्दा गाजत असून कुटुंबातील व्यक्ती करदाता असल्याने लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला आहे. याबाबतची माहिती महिला व बाल कल्याण विभागाकडून संबंधित लाभार्थींना देण्यात येत असून विभागाच्या सूचना फलका . सन २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महायुती सरकाराने जून २०२४मध्ये मुख्यमंत्री लाकडी बहीण योजना जाहीर केली. त्यावेळी शासन…

Read More

ग्रामीणमध्ये अघोषित भारनियमन; शेतकऱ्यांनी वाचला समस्यांचा पाढा:काम करा, अन्यथा बदली करून घ्या; आमदार देशमुखांचा अधिकाऱ्यांना इशारा‎

ग्रामीणमध्ये अघोषित विद्युत भारनियमन सुरू असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आढावा बैठकीत समस्यांचा पाढाच वाचला. आधीच पावसाच्या दीर्घ खंडामुळे शेतकरी चिंतातूर असतानाच िवद्युत पुरवठ्याच्या समस्येमुळे ते मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आ. नितीन देशमुख यांनी बाळापूर मतदारसंघातील समस्यांबाबत महावितरण कंपनीच्या अभियंते, अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या, कामे न करणाऱ्या…

Read More

मुंबईत भरधाव कारने 9 वर्षांच्या चिमुरड्याला चिरडलं:वांद्रेपरिसरात भीषण अपघात, महिला चालकाला अटक

वांद्रे पश्चिम परिसरात भरधाव इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला चाललेल्या नऊ वर्षांच्या चिमुरड्याला चिरडल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (30 ऑगस्ट ) दुपारी घडली. मेहबूब स्टुडिओ परिसरातील जॉन बॅप्टिस्ट रोडवर झालेल्या या भीषण अपघातात अंश रवींद्र गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अंशला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी…

Read More

हरित अमरावतीसाठी नागरिकांचे एक पाऊल पुढे,:बडनेरा ते शिंगणापूर चौफुलीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लागणार वड, पिंपळ, कडूनिंबाची झाडे‎

वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती-यवतमाळ मार्गावरील बडनेरा ते शिंगणापूर चौफुली तसेच चांदूर रेल्वे मार्गावरील राजुरा गावापर्यंत रस्त्य . या दोन्ही प्रमुख मार्गांच्या अनेक भागात सावली देणाऱ्या वृक्षांचा अभाव जाणवत असल्याने उन्हाळ्यात प्रवाशांना तीव्र उष्णतेचा सामना करावा लागतो. बडनेरा ते शिंगणापूर चौफुली…

Read More

नेरपिंगळाई येथील गणेश चौकात गुंजला ‘बदलाव जरूरी हैं’चा नारा:महिला, युवक, विद्यार्थी व शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती‎

‘बदलाव जरूरी है…चलो दिल्ली!’ या घोषणांनी येथील गणेश चौक परिसर दुमदुमून गेला. १ सप्टेंबरच्या ‘चलो दिल्ली’ अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आयोजित केलेल्या जनजागरण सभेमुळे असे झाले होते. सभेला महिला, युवक, विद्यार्थी, शेतकरी तसेच नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाला समविचारी राजकीय पक्ष आणि मित्रपक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त् यांनीही हजेरी लावली होती. तरुणाईसमोरील बेरोजगारी, शिक्षणाच्या वाढत्या खर्चाचा प्रश्न…

Read More

अंबा नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर महापौरांचा दणका:दंडांची कारवाई, हॉस्पिटलचा जैव वैद्यकीय कचरा नाल्यात टाकणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश‎

शहरातील नाले, सार्वजनिक ठिकाणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिकेने आता कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील राजकमल चौक ते राजापेठ या मार्गादरम्यान मध्यभागी असलेल्या अंबा नाल्याची महापौर श्रीचंद तेजवानी यांनी रविवार, ३० ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. संबंधितांकडून दोन दंड आकारण्यात आले. शहर स्वच्छ ठेवणे…

Read More

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार सरींचा अंदाज, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

ऑगस्ट महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने राज्यातील अनेक भागांत पावसाची तूट कायम आहे. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून, राज्यातील काही भागांत मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार,…

Read More

गायक अंकित हत्याकांड, 2 शूटर्सचे एन्काउंटर:यूपी पोलिसांची कारवाई, हरियाणाला जात होते पळून; 20 राऊंड गोळीबार, 2 फरार

हरियाणवी गायक अंकित बालियान हत्याकांडातील दोन शूटर सुमित आणि मोहित यांना यूपी पोलिसांनी सोमवारी सकाळी एका चकमकीत ठार केले. शामलीचे एसपी नरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, दोन्ही शूटर बाईकने शामलीहून सोनीपत (हरियाणा) च्या दिशेने पळून जात होते. खबऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी त्यांना घेरले. पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनाही गोळीबार करावा लागला. दोन्ही…

Read More

90 हजार मातीच्या बाप्पांमधून निसर्गरक्षणाचा दिला संदेश:यंदा घराघरांत विराजमान होणार पर्यावरणपूरक गणेशमूर्ती : मूर्तींच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांची झाली वाढ‎

लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे पंधरा दिवस उरले असून, घराघरांत आणि गल्लीबोळांत गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. यंदाचा गणेशोत्सव केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित न राहता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा ठरणार आहे. मूर्तिकारांनी गेल्या आठ महिन्यांपासून अथक परिश्रम घेत तब्बल ९० हजार ते १ लाख मातीच्या गणेशमूर्ती साकारल्या आहेत. पर्यावरणपूरक मूर्तींच्या वाढत्या मागणीमुळे यंदाच्या गणेशोत्सवाला निसर्गरक्षणाची…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:श्रावण सोमवारी जुळून आला संकष्टीचा दुर्मिळ योग, पिता-पुत्राच्या पूजेसाठी उसळणार मंदिरांत गर्दी‎

श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी श्रीगणेशाला समर्पित असून, यंदा २०२६ मध्ये ही संकष्टी चतुर्थी सोमवारी ३१ ऑगस्ट रोजी तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या दुर्मिळ तसेच विशेष योगायोगावर आलेली आहे. यामुळे या सोमवारी शिवालय व श्री गणेश मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. ही हेरंब संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी महादेवाला बिल्वपत्र व श्रीगणेशाला दुर्वा अर्पण करणे हितावह…

Read More