Headlines

पाकिस्तानातून बेकायदेशीर सौंदर्यप्रसाधनांचा नागपूरमध्ये पर्दाफाश:मुंबईमार्गे पुरवठ्याचा संशय; 15 हजारांचा माल जप्त

नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत पाकिस्तानातून बेकायदेशीरपणे आयात केलेल्या सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त केला आहे. मुंबईमार्गे नागपूरमध्ये आलेल्या या मालाची किंमत सुमारे 15,186 रुपये आहे. इतवारी परिसरातील मे. साईबाबा ट्रेडर्स, कासारपुरा गल्ली येथे पथकाने छापा टाकला. या छाप्यात “मेड इन पाकिस्तान” असे लेबल असलेली विविध सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवलेली आढळली. जप्त केलेल्या मालामध्ये…

Read More

अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठात रूपांतर, उच्चस्तरीय समिती स्थापन:शैक्षणिक गुणवत्ता; आरक्षण-शुल्क नियंत्रण यावर दोन महिन्यांत अहवाल

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अधिक स्वायत्तता देण्याच्या उद्देशाने अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक संस्था, व्यवस्थापन आणि इतर संबंधित घटकांकडून होत असलेल्या मागण्या लक्षात घेऊन, या विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. भूषण पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत उच्च व…

Read More

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण:आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; सुटका होण्याची शक्यता

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवून सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, तर सबळ पुराव्याअभावी इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, आता या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दोषी शरद कळसकरचा जामीन मंजूर केल्यामुळे त्याची कारागृहातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा…

Read More

जीआयएस मॅपिंगमध्ये त्रुटी ठेवणाऱ्या कंपनीला ३० कोटींचे कंत्राट:सजग नागरिक मंचाची स्थायी समितीकडे फेरविचार करण्याची मागणी

पुणे महापालिकेच्या जीआयएस मॅपिंग प्रकल्पात गंभीर त्रुटी ठेवणाऱ्या कंपनीलाच पुन्हा ३० कोटी रुपयांचे मोठे कंत्राट देण्याचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी स्थायी समितीकडे या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. २०१६ मध्ये महापालिकेच्या मिळकतींचे जीआयएस मॅपिंगचे काम ‘सार आयटी रिसोर्सेस प्रा. लि.’ या कंपनीला देण्यात आले…

Read More

'लिंकिंग'ची भानगड शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट:खते घेताना कृषी सेवा केंद्रांकडून महागड्या औषधी घेण्याची सक्ती, रोहिणी खडसे यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांसोबत महागडी औषधी घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या मुद्यावर संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल या प्रयत्नातच सरकार व मोठमोठ्या कंपन्या असतात की काय असा प्रश्न निर्माण होतो. लिंकिंग ही भानगड तर शेतकऱ्यांची सरळ सरळ लूट आहे,…

Read More

संजय राऊत- मुरलीधर मोहोळ भेटीने चर्चांना उधाण:पुणे दौऱ्यात दोघांमधील भेट राजकीय चर्चेचा विषय; बैठकीआधी अनपेक्षित वळण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीत एक वेगळीच घडामोड समोर आली आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी त्यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांनी मोहोळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या….

Read More

भाऊ गेला हेच मोठे नुकसान, हा पराभव गौण:गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य, धनंजय देशमुख यांचे अश्विनी देशमुखांच्या पराभवावर भाष्य

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ग्राम पंचायत निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवाची पंचक्रोशीत चर्चा सुरू असताना आता संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माझा भाऊ गेला हे आमचे मोठे नुकसान आहे. त्यापुढे हा पराभव गौण आहे. गावकऱ्यांचा कौल आम्हाला…

Read More

बच्चू कडूंनी 'प्रहार'च्या विलिनीकरणाची चर्चा फेटाळली:म्हणाले – निव्वळ आमदारकीसाठी शिवसेनेसोबत जावे एवढा मी नालायक नाही

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आपल्या संघटनेची शिवसेनेसोबत होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा फेटाळली आहे. आम्ही खूप संघर्षातून संघटना उभी केली आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या बातम्या पाहून दुःख वाटले. मी जुना शिवसैनिकच आहे. शिवसेनेशी बंडखोरी करून आम्ही प्रहार संघटना उभी केली. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षात न जाता स्वतःच्या जिवावर संघर्ष करणारा मी राज्यातील एकमेव कार्यकर्ता…

Read More

राज्यातील शाळांच्या निकालात 1 मेपासून मोठा बदल:आता प्रगतीपुस्तकासोबत पालकांना उत्तरपत्रिकाही दाखवणे बंधनकारक

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाचा निकाल 1 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे. मात्र, यंदा केवळ निकाल जाहीर होणार नाही, तर शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा आणि बदल घडवणारा निर्णयही लागू केला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना फक्त प्रगतीपुस्तक देण्यावर मर्यादा न राहता, त्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन…

Read More

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही:आमदार संजय केनेकरांनी आमदारकीचा पत्ता कट होताच व्यक्त केल्या भावना; पुनरागमनाचे संकेत

भाजपने विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यात प्रज्ञा सातव वगळता इतर 5 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या आमदार संजय केनेकर यांचा पत्ता कट झाला आहे. संजय केनेकर यांनी या प्रकरणी कवीवर्य सुरेश भट यांच्या कवितेचा दाखला देत हा आपला पराभव नसल्याचे स्पष्ट…

Read More