सर्व विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करत स्वत: मध्ये सुधारणा करण्याची गरज:तहसीलदार महेश सावंत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; नवागतांचे केले स्वागत
अहिल्यानगरसह शेजारील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंद्यांची उभारणी होत असल्याने येणारा काळ नवोदित अभियंत्यांसाठी रोजगाराच्या दृष्टीने अत्यंत आशादायी ठरणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना अपयशासाठी इतरांना जबाबदार न धरता आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करण्यावर भर द्यावा, असे प्रतिपादन तहसीलदार महेश सावंत यांनी केले. संजीवनी पॉलीटेक्नकच्या प्रथम व थेट द्वीतिय वर्षाच्या नवागतांचे स्वागत ‘संजीवनी तंत्रआरंभ’ या…