Headlines

नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं आयुष्य:25 लाख, 21 तोळे सोने अन् तरीही छळ कायम; जादूटोण्याच्या नावानेही धमकावलं

नाशिक शहरातील जेलरोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संसार सुखाचा व्हावा म्हणून माहेरकडून लाखो रुपये आणि सोनं देऊनही एका विवाहितेला सासरच्या छळाला सामोरं जावं लागलं. अखेर सततचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन न झाल्याने तिने टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर परिसरात संतापाचं…

Read More

रामद्रोह म्हणजेच देशद्रोह:श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरे सेना आक्रमक, राज्यभरातील मंदिरांमध्ये 'रामरक्षा महाआरती'चे आयोजन

अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील देणगीच्या आर्थिक गैरव्यवहार आणि लुटीच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता थेट रस्त्यावर उतरणार आहे. या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख राम आणि हनुमान मंदिरांमध्ये ‘रामरक्षा महाआरती’ आयोजित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गट सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहे. श्रीराम मंदिर उभारणीत…

Read More

जाळीचा देव ते सावळदबारा रस्त्याला मंजुरी द्या:इद्रीस मुलतानी यांची मागणी, येथे येणाऱ्या भाविकांचा 20 किलोमीटरचा अतिरिक्त फेरा वाचणार‎

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेल्या श्रीक्षेत्र जाळीचा देव ते सावळदबारा या रस्त्याला जिल्हा किंवा ग्रामीण मार्ग म्हणून मान्यता देऊन क्रमांक घोषित करावा, अशी मागणी भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे श्री चक्रधर स्वामी यांचे…

Read More

भारत-अमेरिका कराराविरोधात शेतकरी, मजूर, कामगारांचे आंदोलन:किसान सभेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन आणि कामगार संघटनांचा महासंघ असलेल्या आयटकच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. भारताने अमेरिकेसोबत केलेला ‘ट्रेड डील’ कृषी व व्यापारविषयक करार शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी घातक असल्याने तो रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात…

Read More

उद्धव ठाकरेंचा शिर्डी दौरा:"गद्दार'' वगळता मराठी माणूस पंतप्रधान ‎होणार असेल तर पाठिंबा- उद्धव ठाकरे‎

“गद्दार सोडून महाराष्ट्रातील‎ कोणताही मराठी माणूस पंतप्रधान‎ होणार असेल, तर शिवसेना त्याला ‎‎नक्कीच पाठिंबा देईल,” असे मोठे ‎‎विधान शिवसेना (ठाकरे गट)‎पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‎शिर्डी दौऱ्यात केले. त्यांनी केंद्र‎सरकार, भाजप, शिंदेंच्या शिवसेनेवर ‎‎जोरदार टीका केली.‎ साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर ‎आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे ‎म्हणाले, “मराठी माणसाने पंतप्रधान‎ होण्याचे स्वप्न पाहण्यात काहीच गैर ‎नाही. मात्र संघाचा…

Read More

जि.प. तयार करणार आरोग्य संपन्न गाव:सीईओंचे वर्षभराच्या आराखड्याचे निर्देश, कार्यशाळेस जिल्हाभरातून मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद‎

राज्य शासनाचे ‘माझं गाव-आरोग्य संपन्न गाव’अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी योग्य आखणी आणि सूक्ष्म नियोजन करून ग्रामस्तरीय समित्या सक्रिय करा. पुढे याच समित्या अधिक सक्षम करण्यासाठी तालुका स्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम करुन वर्षभराचा आराखडा तयार करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी येथे केले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत स्थानिक ग्रामसेवक…

Read More

चिमेगावात पूर्णा नदीपात्रात वाळू तस्करांवर मोठी कारवाई:2 जेसीबी, 3 हायवा, 1 ट्रॅक्टरसह 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे २ जेसीबी, ३ हायवा, १ ट्रॅक्टरसह १.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व हिंगोलीच्या महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ४ गुन्हा दाखल झाला आहे….

Read More

बीड हादरले!:अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने केला गेम, कार्यक्रम ओकेच्या मेसेजने गेले पकडल्या

बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 25 वर्षींय पत्नीने प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या 27 वर्षीय पतीचा काटा काढला आहे. अपघाताचा बनाव रचणाऱ्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. अपघातानंतर प्रियकराने काम फत्ते झाल्याचा निरोप दिल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 1 जून रोजी लिंबागणेश ते अंजनवती रस्त्यावर 27…

Read More

अभिनेत्री दिशा पाटनीने वडिलांकडून विमानतळावर जेवण मागवले:अक्षय कुमारने अक्षरा आणि राजपालसोबत जेवण केले, बरेलीत म्हटले- मजा आली

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीने सोमवारी बरेली विमानतळावर आपल्या वडिलांकडून आवडते जेवण मागवले. आपल्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईला जात असताना त्यांचे चार्टर्ड विमान बरेली विमानतळावर उतरले. तिच्यासोबत अभिनेते अक्षय कुमार, राजपाल यादव आणि अक्षरा सिंग देखील होते. आपल्या शहरात पोहोचताच दिशाने वडिलांना फोन केला आणि घरच्या जेवणाची फर्माईश केली. वडीलही लगेच घरी…

Read More

'ही चंद्रचुऱ्याची नक्षी' पुस्तकाचे प्रकाशन:शहरी जीवनाने हळवेपण हिरावले, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे मत

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘शहरी जीवनाने आपले हळवेपण हिरावून घेतले आहे’ असे मत व्यक्त केले. ‘ही चंद्रचुऱ्याची नक्षी’ या ज्येष्ठ लेखक अनंत सामंत यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या सान्निध्यात राहत असल्याने त्यांना आता शहरातील माणसे, उंच इमारती आणि मोठ्या गाड्यांची भीती वाटू लागली आहे, असे पाटेकर म्हणाले. ही…

Read More