Headlines

आरोग्य विभागाचे बदली सत्र पूर्ण:91 कर्मचाऱ्यांची वर्णी, अमरावती जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्थानांतर

जिल्हा परिषदेत सुरू झालेले बदली सत्र आज, सोमवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. दुपारपूर्वी पूर्णत्वास गेलेल्या या अभियानात आरोग्य विभागातील ९१ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. आरोग्य विभागातील सन २०२६ च्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेनुसार विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करावयाच्या होत्या. त्यानुसार आज सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा:महिला प्रवाशाचे दोन लाखांचे दागिणे, रोख रक्कम सुखरूप परत‎

प्रवाशांकडून अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तणुकीबाबत तक्रारी होत असताना, अंजनगाव सुर्जी येथील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यदक्षतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. परतवाडा आगाराच्या बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची अंदाजे दोन लाख रुपये किमतीची सोन्याची पोत व रोख रक्कम हरवली होती. मात्र, वाहक व चालकाच्या सतर्कतेमुळे हा मौल्यवान ऐवज महिलेला सुखरूप परत मिळाला. १०…

Read More

शहरातील वाहतुकीच्या गंभीर समस्येवर उपाययोजना हव्यात, उपमहापौरांचे पोलिस आयुक्तांना निवेदन, कारवाईची मागणी‎

शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून मुख्य चौक, बाजारपेठा, शाळा परिसरात आणि मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच मोठ्या संख्येने वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या बरोबरीनेच शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची उणीव असल्याने नागरिकांना…

Read More

अकोला-वाशीम जिल्ह्यातील 835 सोसायट्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करू‎:जिल्हा सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांची माहिती‎

“सेवा सहकारी सोसायटी हा ग्रामीण सहकार व्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे अकोला आणि वाशीम जिल्ह्यातील सर्व सेवा सहकारी सोसायट्या आर्थिक, तांत्रिक आणि प्रशासकीयदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत,’ असे प्रतिपादन अकोला-वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जयराज कोरपे यांनी केले. रविवार, १० मे रोजी सेवा सहकारी सोसायटी, मनब्दा यांच्या नवीन सुसज्ज इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत…

Read More

वाऱ्यामुळे शेतकऱ्याचे सोलर पंप जमीनदोस्त:पुरवठादार कंपनीचा गलथानपणा; योजनेतील त्रुटी चव्हाट्यावर, शेतकऱ्याचा आराेप‎

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या सोलर पंपाचे प्रचंड नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एकीकडे सोलर पंप जमीनदोस्त झाले. दुसरीकडे फळबागांचे अतोनात नुकसान झाले. सौर कृषी पंप योजनेतील त्रुटीही चव्हाट्यावर आल्या आहेत. काटेपूर्णा येथील महिला शेतकरी संगीता रवींद्र उमाळे यांच्या शेतातील ५ अश्वशक्तीचा सौर पंप वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कोलमडून पडला. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे….

Read More

सुधारित निवृत्तीवेतन योजनेचे पडसाद; जुनी पेन्शन लागू न झाल्यास आंदोलन:जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक; आरडीसींना दिले निवेदन‎

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेविरोधात सोमवारी पडसाद उमटले. या योजनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत फुले-शाहू-आंबेडकर शिक्षक संघटना (पॅक्टो) व अशोक प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फ त मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. या योजनेतील तरतुदी कर्मचाऱ्यांच्या हिताविरोधात असून त्या पूर्णतः अन्यायकारक व दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठाम आरोप संघटनेने केला…

Read More

करमाळ्यातील सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात 25 जोडपी विवाह बंधनात:श्रीराम प्रतिष्ठानतर्फे आयोजन, हजारो वऱ्हाडी मंडळीचा सहभाग‎

करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाह बंधात अडकली. सनई चौघाड्याच्या गजरात झालेल्या या सोहळ्यास हजारो वऱ्हाडी मंडळीने सहभाग घेतला. वधू वरांना आर्शिवाद देण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्याने करमाळा तालुक्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे….

Read More

बचतगटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यस्थेत महिलांचा सहभाग वाढला:पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन, बचतगटांना अनुदानाचे वितरण‎

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नारीशक्तीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बचतगटांच्या चळवळीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचा सहभाग सातत्याने वाढत असून, बचतगट व ‘उमेद’ अभियानाला शासनाचे भक्कम पाठबळ आहे. येणाऱ्या काळात उमेद अभियानाचा प्लॅटफॉ . ‘लखपती दीदी’ निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, लाडक्या बहिणींच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. तसेच, अहिल्यानगरमध्ये एकल महिलांसाठी सुरू झालेली चळवळ…

Read More

"भोंदु गुरू माऊली'चा विशेष तपास, धाराशिवनंतर पंढरीतून तिसरी तक्रार:समाजमाध्यमावरील छबी डिलीट, धाराशिवच्या भक्ताचा नोंदवला जबाब‎

कासव देऊन पाठीमागील पीडा दूर करण्याचा दावा करून अनेक भक्तांची आर्थिक लुट करणारा नानासाहेब विरकर उर्फ गुरु माऊली याने अनेकांची फसवणूक करुन आर्थिक लुट केल्याचे प्रकरणे समोर येऊ लागली असून रविवारी दि १० रोजी धाराशिव आणि सोमवार दि.११ मे रोजी पंढरपूरच्या पिडीत भक्तांने आपलीही फसगत झाल्याची ऑनलाईन तक्रार दाखल केली असून त्याची पडताळणी करण्याचे काम…

Read More

वावटळीत पत्रे व दगड पडून महिलेचा मृत्यू‎:वैरागमधील संजय नगरात अचानक घडलेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी, उपचार सुरू‎

वैशाखाच्या तळपत्या उन्हात माणूस नकळत सावलीचा आसरा शोधत असतो. अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हापासून काही क्षण दिलासा मिळावा म्हणून भिंतीच्या कडेला विसावलेल्या तिघी महिलांना मात्र हा आसरा जीवघेणा ठरला. काही क्षणांतच आनंदाने सुरू असलेला दुपारचा निवांत क्षण आक्रोशात बदलला. अचानक आलेल्या वावटळीने घरावरील पत्रे उडाले तसेच कुंभाटी आणि दगड वीटा पडून एका महिलेचा मृत्यू झाला…

Read More