‘विकसित भारत’ जिल्हास्तरीय पंच संमेलनाकडे लोकप्रतिनिधींची पाठ:केवळ पाच सरपंच उपस्थित, प्रशासनाची फजिती
विकसीत भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियानांतर्गत हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय पंच संमेलनाकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली असून जिल्हयातील ५६३ पैकी केवळ पाच ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित राहिल्याने प्रशासन चांगलेच तोंडघाशी पडले. अखेर कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसवून वेळ मारून नेण्यात आली. या प्रकारामुळे जिल्हा परिषद पंचायत विभाग व हमी योजनेचा कारभार चर्चेत आला आहे. केंद्र…