दिवसाला जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी 150 अर्ज:70 दाखल्यांनाच अधिकाऱ्यांची मंजुरी, दोन महिन्यांत 4 हजारांवर दाखले रखडले, विद्यार्थी, पालक त्रस्त
. शहरात दिवसाला जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी १५० अर्ज मनपा मुख्यालयात सादर केले जात असताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून (डीएचओ) केवळ ७० दाखलेच एका दिवसात मंजूर होत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ४ हजारांवर दाखले प्रलंबित आहेत. परिणामी दाखले मिळण्याच्या संथगतीमुळे विद्यार्थी, पालक, सर्वसामान्यांची शैक्षणिक व इतर आवश्यक कामे खोळंबली आहेत. ते मनपा प्रशासनासह शासनाविरोधात सातत्याने संताप व्यक्त…