तोंडापूरच्या धरण काठावर घातक रसायनाची गळती:तीन रोही मृत्युमुखी, पक्षी व वन्यजीवांवर संकट
अजिंठा व जामनेर वनक्षेत्राच्या हद्दीत तोंडापूर धरणाच्या काठावर ३ रोही (नीलगाय) कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आले आहेत. धरणाच्या काठावर लपवून ठेवलेल्या २३ घातक रसायनांच्या ड्रममधून झालेल्या गळतीमुळेच हा प्रकार घडल्याचा संशय आहे. यापूर्वी धरणातील मासे आणि तोंडापूर गावातील ८ ते १० शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी याच रसायनांमुळे दगावले होते. आता हाच प्रादुर्भाव वन्यजीवांपर्यंत पोहोचल्याची शंका डॉ….