यूपीच्या 23 जिल्ह्यांत पूर:बिहारमध्ये 5 लाख जण प्रभावित; एमपीत मंदाकिनी-नर्मदेला पूर,, हिमाचलमध्ये 266 मृत्यू
उत्तर प्रदेशात सततच्या पावसामुळे 23 जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. वाराणसी आणि चित्रकूट सर्वाधिक प्रभावित आहेत. आतापर्यंत 16 हजारांहून अधिक जणांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले आहे. वाराणसीत आतापर्यंत 407 कुटुंबांनी घरे सोडली आहेत. काशीतील सर्व 84 घाट पाण्याखाली गेले आहेत. बिहारच्या 16 जिल्ह्यांतील सुमारे 5 लाख जणांना पुराचा फटका बसला आहे. गंगेसह 8…